
राज ठाकरे यांनी घडवलेल्या एका अराजक नाट्याचा अंक नुकताच संपलाय.गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहण्याची सवय (की नशा ?) त्यांना जडलीय.कधी ते अमिताभ बच्चनला महाराष्ट्रात उपरे ठरवतात,कधी बाळासाहेबांसाठी संसदेचा अनादर करतात,तर कधी जेट कर्मचा-यांच्या आंदोलनात स्वत:ची पाठ थोपटून घेतात.महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत ' मराठी खतरेमें ' असा नारा देत पर्यायी सरकार'राज'तयार करण्याची त्यांचा सध्या प्रयत्न सुरु आहे.
सध्या राज ठाकरेंना नवीन निमीत्त मिळालं ते रेल्वे भरतीच्या परीक्षेच..यापुर्वीही त्यांनी शिवसेनेत असताना ही परीक्षा उधळून लावली होती.राज यांच्या या आक्रमणामुळे शिवसेनाला मी मुंबईकर ही मोहीम आवरती घ्यावी लागली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि परिसरात याच मोठा फटका सेनेला बसला.आता राजनी सेना सोडलीय, मात्र त्यांचा पीळ अजूनही कायम आहे हेच यातून दिसून आलंय.राज यांच्या या आंदोलनाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले.तीन जणांचा बळी गेला.शेकडो बसेस,गाड्या फुटल्या.ऐन दिवाळीच्या हंगामावर जे आर्थिक नुकसान मुंबईसह सा-या राज्याला,देशाला सहन करावं लागलं ते वेगळंच.
राज ठाकरेंच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तर त्यांनी निर्माण केलेल्या राजमार्गावरचा फोलपणा लक्षात येतो.बाळासाहेबांची प्रतिमा म्हणून ते सेनेत पुढं आले.ठाकरे या आडनावाचं सारं ग्लॅमर त्यांना जन्मल्यापासून मिळतंय.मात्र ज्यांनी त्यांना नाव दिलं,सन्मान दिला,प्रतिष्ठा दिली तोच त्यांचा 'विठ्ठल' अडचणीत असताना त्यांनी केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षा पूर्ण करण्याकरता शिवसेना सोडली.फाटापूट या मराठी माणसाला लागलेल्या जुन्या दोषांपासून तेही वेगळे नाहीत हेच यावेळी दिसून आलं.
मनसे निर्माण केल्यानंतर त्यांनी नवनिर्माणाच्या गोष्टी भरपूर केल्या आहेत.मात्र सेनेच्या चाळीस वर्षापूर्वीच्या कॅसटमधूनच त्यांचा नवनिर्माणाचा राग बाहेर पडतोय. परस्परांमध्ये वेगवेगळ्या द्वेषांची भिंत उभी करणा-या या मराठी माणसांवर भाषीक द्वेषाची नवी चादर लपटण्याचा प्रयत्न ते करतायत.ज्या तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ते तरुण देशामधल्या गरीब राज्यामधून आले होते.जातीभेद,लिंगभेद,शैक्षणीक विषमता असणा-या या प्रदेशातून हे सारे तरुण मुंबईत भावी आयुष्य घडवणारी परीक्षा देण्यास आले होते.मात्र त्यांच्या या स्वप्नांना तडा देण्याचं काम मनसैनिकांनी केलं. या आंदोलनानंतर या राज्यातल्या नागरिकांच्या मनात महाराष्ट्रविषयी अढी निर्माण झाली तर याला जवाबदार कोण ? केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षेनी झपाटलेल्या राज यांनी सा-या राज्यात अराजक माजवलंय.ज्या राज्यकर्त्यांनी याला वेसण घालणं आवश्यक आहे ते तर केवळ मतांचा हिशेब करत काम करतायतं.
मनसेची स्थापना झाल्यापासून आघाडी सरकारचा राजबद्दलचा दृष्टीकोण मवाळ झालाय.शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याकरताचं ते या राज सेनेचा वापर करतायत.मुंबई,पुणे नाशिक या राज्याच्या सुवर्ण त्रिकोण समजल्या जाणा-या पट्यात विधानसभेच्या 100 जागा येतात.या भागात राज यांचा प्रभाव आता जाणवण्याइतपत वाढलाय. एकिकडं राज मराठी माणसांची मतं फोडतील अशी व्यवस्था करायची तर दुसरीकडं राजची भिती दाखवून अमराठी मंत मिळवायची अशी या मायबाप आघाडी सरकारची कल्याणकारी योजना आहे.ज्या कॉँग्रेसपक्षानं चाळीस वर्षापूर्वी बाळासाहेबांना बळ दिलं तीच कॉँग्रेस आज मागचा सर्व अनुभव असूनही राजला हिरो करण्याचा प्रयत्न करतीय.
राज यांच्या उपद्रव मुल्याचा आंदाज सहा महिन्य़ापूर्वीच सा-यांना आला होता.यामुळे यावेळी राज यांना अटक करण्यापूर्वी राज्य सरकारनं संपूर्ण तयारी करायला हवी होती.मात्र राज्य सरकार बेफिकीर राहीले. राजच्या कार्यकर्यांनी महाराष्ट्रात राडे सुरु केल्यानंमकरही आपले आर.आर.आबा फक्त इशारेच देत होते.केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील तर आता अशा ठिकाणी जाऊन पोटलेत की तिथून त्यांच्याबद्दल काही अपेक्षा करणंच चुकीचं आहे.अखेर संसदेत झालेल्या गदारोळानंतर देशमुख सरकारवरचा दबाव वाढला आणि त्यांनी राज यांच्या भोवती खटल्यांचा चक्रव्यूह उभा केला.या चक्रव्युहातून आपली सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर राज यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.जर ही गोष्ट राज यांनी दोन दिवसांपूर्वीच केली असती तर हे सारे महाभारत घडलेच नसते.मात्र त्यांना कशाचंही सोयरसूतक नाहीयं. केवळ स्वत:ची प्रतिमा मोठी करण्याचा हा 'राज' हट्ट आहे.
राज यांचा मुद्दा निघाला की दक्षिणेकडची राज्य, बंगालमधले मार्क्सवादी यांची उदाहरण दिली जातात. या सर्व राज्यांचा अतिरेकी भाषाप्रेम ही देखील नक्कीच धिक्कार करण्याची गोष्ट आहे.त्या राज्यातले अशा प्रकराचे अतिरकेकी प्रयत्न हे देखील हाणून पाडायलाच हवेत.मात्र त्याचबरोबर तुमच्या आमच्या महाराष्ट्रानंही आपली सहिष्णुतेची परंपरा एखाद्या महत्वकांक्षी राज ठाकरेंसाठी मोडणं चुकीचं आहे.बिहार उत्तर प्रदेशातले नागरिक हे आपले देशबांधवच आहेत.त्यांना मुंबईसह राज्यात रोजगारासाठी येण्याचा, आणले सण समारंभ साजरे करण्याचा एवढंच नाही तर इंथ स्थायिक होण्याचाही पूर्ण अधिकार आहे. (असाच अधिकार महाराष्ट्रीयन नागरिकांनाही आहे) त्यांना समानतेची वागणूक मिळाली तर अमरसिंह लालूप्रसाद यादव यासारख्या आगलाव्या राजकारण्यांची दुकाणं बंद होतील.
एका 370 व्या कलमामुळे जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामध्ये मोठी भिंत गेल्या साठ वर्षात तयार झालीय.आज राज ठाकरे,करुणानिधी यासारखे काही नेते थेटपणे तर अमर,मुलायम लालूंसारखे नेते अप्रत्यक्षपणे अशा अनेक भिंती या देशात उभ्या करत आहेत.हे देश दुभंणारे ' राजकाराण' थांबवण्यासाठी प्रयत्न करायचा की यासबोत वाहवंत जायचं ह्याचा निर्णय करण्याची वेळ आता आली आहे.
सध्या राज ठाकरेंना नवीन निमीत्त मिळालं ते रेल्वे भरतीच्या परीक्षेच..यापुर्वीही त्यांनी शिवसेनेत असताना ही परीक्षा उधळून लावली होती.राज यांच्या या आक्रमणामुळे शिवसेनाला मी मुंबईकर ही मोहीम आवरती घ्यावी लागली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि परिसरात याच मोठा फटका सेनेला बसला.आता राजनी सेना सोडलीय, मात्र त्यांचा पीळ अजूनही कायम आहे हेच यातून दिसून आलंय.राज यांच्या या आंदोलनाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले.तीन जणांचा बळी गेला.शेकडो बसेस,गाड्या फुटल्या.ऐन दिवाळीच्या हंगामावर जे आर्थिक नुकसान मुंबईसह सा-या राज्याला,देशाला सहन करावं लागलं ते वेगळंच.
राज ठाकरेंच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तर त्यांनी निर्माण केलेल्या राजमार्गावरचा फोलपणा लक्षात येतो.बाळासाहेबांची प्रतिमा म्हणून ते सेनेत पुढं आले.ठाकरे या आडनावाचं सारं ग्लॅमर त्यांना जन्मल्यापासून मिळतंय.मात्र ज्यांनी त्यांना नाव दिलं,सन्मान दिला,प्रतिष्ठा दिली तोच त्यांचा 'विठ्ठल' अडचणीत असताना त्यांनी केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षा पूर्ण करण्याकरता शिवसेना सोडली.फाटापूट या मराठी माणसाला लागलेल्या जुन्या दोषांपासून तेही वेगळे नाहीत हेच यावेळी दिसून आलं.
मनसे निर्माण केल्यानंतर त्यांनी नवनिर्माणाच्या गोष्टी भरपूर केल्या आहेत.मात्र सेनेच्या चाळीस वर्षापूर्वीच्या कॅसटमधूनच त्यांचा नवनिर्माणाचा राग बाहेर पडतोय. परस्परांमध्ये वेगवेगळ्या द्वेषांची भिंत उभी करणा-या या मराठी माणसांवर भाषीक द्वेषाची नवी चादर लपटण्याचा प्रयत्न ते करतायत.ज्या तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ते तरुण देशामधल्या गरीब राज्यामधून आले होते.जातीभेद,लिंगभेद,शैक्षणीक विषमता असणा-या या प्रदेशातून हे सारे तरुण मुंबईत भावी आयुष्य घडवणारी परीक्षा देण्यास आले होते.मात्र त्यांच्या या स्वप्नांना तडा देण्याचं काम मनसैनिकांनी केलं. या आंदोलनानंतर या राज्यातल्या नागरिकांच्या मनात महाराष्ट्रविषयी अढी निर्माण झाली तर याला जवाबदार कोण ? केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षेनी झपाटलेल्या राज यांनी सा-या राज्यात अराजक माजवलंय.ज्या राज्यकर्त्यांनी याला वेसण घालणं आवश्यक आहे ते तर केवळ मतांचा हिशेब करत काम करतायतं.
मनसेची स्थापना झाल्यापासून आघाडी सरकारचा राजबद्दलचा दृष्टीकोण मवाळ झालाय.शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याकरताचं ते या राज सेनेचा वापर करतायत.मुंबई,पुणे नाशिक या राज्याच्या सुवर्ण त्रिकोण समजल्या जाणा-या पट्यात विधानसभेच्या 100 जागा येतात.या भागात राज यांचा प्रभाव आता जाणवण्याइतपत वाढलाय. एकिकडं राज मराठी माणसांची मतं फोडतील अशी व्यवस्था करायची तर दुसरीकडं राजची भिती दाखवून अमराठी मंत मिळवायची अशी या मायबाप आघाडी सरकारची कल्याणकारी योजना आहे.ज्या कॉँग्रेसपक्षानं चाळीस वर्षापूर्वी बाळासाहेबांना बळ दिलं तीच कॉँग्रेस आज मागचा सर्व अनुभव असूनही राजला हिरो करण्याचा प्रयत्न करतीय.
राज यांच्या उपद्रव मुल्याचा आंदाज सहा महिन्य़ापूर्वीच सा-यांना आला होता.यामुळे यावेळी राज यांना अटक करण्यापूर्वी राज्य सरकारनं संपूर्ण तयारी करायला हवी होती.मात्र राज्य सरकार बेफिकीर राहीले. राजच्या कार्यकर्यांनी महाराष्ट्रात राडे सुरु केल्यानंमकरही आपले आर.आर.आबा फक्त इशारेच देत होते.केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील तर आता अशा ठिकाणी जाऊन पोटलेत की तिथून त्यांच्याबद्दल काही अपेक्षा करणंच चुकीचं आहे.अखेर संसदेत झालेल्या गदारोळानंतर देशमुख सरकारवरचा दबाव वाढला आणि त्यांनी राज यांच्या भोवती खटल्यांचा चक्रव्यूह उभा केला.या चक्रव्युहातून आपली सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर राज यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.जर ही गोष्ट राज यांनी दोन दिवसांपूर्वीच केली असती तर हे सारे महाभारत घडलेच नसते.मात्र त्यांना कशाचंही सोयरसूतक नाहीयं. केवळ स्वत:ची प्रतिमा मोठी करण्याचा हा 'राज' हट्ट आहे.
राज यांचा मुद्दा निघाला की दक्षिणेकडची राज्य, बंगालमधले मार्क्सवादी यांची उदाहरण दिली जातात. या सर्व राज्यांचा अतिरेकी भाषाप्रेम ही देखील नक्कीच धिक्कार करण्याची गोष्ट आहे.त्या राज्यातले अशा प्रकराचे अतिरकेकी प्रयत्न हे देखील हाणून पाडायलाच हवेत.मात्र त्याचबरोबर तुमच्या आमच्या महाराष्ट्रानंही आपली सहिष्णुतेची परंपरा एखाद्या महत्वकांक्षी राज ठाकरेंसाठी मोडणं चुकीचं आहे.बिहार उत्तर प्रदेशातले नागरिक हे आपले देशबांधवच आहेत.त्यांना मुंबईसह राज्यात रोजगारासाठी येण्याचा, आणले सण समारंभ साजरे करण्याचा एवढंच नाही तर इंथ स्थायिक होण्याचाही पूर्ण अधिकार आहे. (असाच अधिकार महाराष्ट्रीयन नागरिकांनाही आहे) त्यांना समानतेची वागणूक मिळाली तर अमरसिंह लालूप्रसाद यादव यासारख्या आगलाव्या राजकारण्यांची दुकाणं बंद होतील.
एका 370 व्या कलमामुळे जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामध्ये मोठी भिंत गेल्या साठ वर्षात तयार झालीय.आज राज ठाकरे,करुणानिधी यासारखे काही नेते थेटपणे तर अमर,मुलायम लालूंसारखे नेते अप्रत्यक्षपणे अशा अनेक भिंती या देशात उभ्या करत आहेत.हे देश दुभंणारे ' राजकाराण' थांबवण्यासाठी प्रयत्न करायचा की यासबोत वाहवंत जायचं ह्याचा निर्णय करण्याची वेळ आता आली आहे.