Wednesday, October 15, 2008

काळी कोजागिरी


अश्विन शुद्ध पोर्णिमा म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा कालच झाली.
स्वच्छ निरभ्र आकाशामधला शुभ्र चंद्राचे प्रतिबींब दुधाच्या ग्लासं पाहणं हा एक आनंदायी अनुभव असतो.मात्र यावर्षी मला ह्या चंद्राचं प्रतिबींब काळं दिसलं.... आपल्या सभोवताली घडणा-या वेगवेगळ्या घटनांची सावली आपल्या आयुष्यावर पडत असते.तसंच काहीसा प्रकार या शुभ्र शामल चंद्राच्या बाबतीतही झाला असावा असं मला यावेळी वाटलं.जगात विशेषत: माझ्या प्रियतम भारत देशात सध्या घडत असलेल्या वेगवेगळ्या घंटनांची सावली पडून हा चंद्र काळा पडला आहे असंच मला वाटतय...
आपल्या देशाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर एका अस्वस्थ रात्रीची काळी सावली सध्या देशावर पडलीय असं म्हणाता येईल.देशातल्या अनेक भागात सध्या अस्वस्थता खदखदतीय..
भारतासाठी सर्वात संवेदनशील मानलं जाणा-या जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ प्रश्नावरुन नुकतचं फार मोठा रक्तपात घडून गेलाय.अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेल्या जमीनीवरुन आपल्या देशातले नागरिक काश्मीरमध्ये स्थायीक होतील...त्यांच्या संपर्कातून काश्मीरी जनतेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रुजवलेली फुटीरतावादाची भावना नष्ट होईल,काश्मीरीयतच्या नावाखाली चालणारं राजकीय दुकान संपेल अशी भिती राज्यातल्या काही पक्षांना वाटली.या भितीमधून त्यांनी जे काही केलं तो सारा इतिहास ताजा आहे.लष्कराचे प्रयत्न आणि देशातल्या जनतेच्या दुवांच्या बळावर काश्मीरमधली परिस्थीती सध्या नियंत्रणात आलीय असं वाटतंय..मात्र पंतप्रधानांच्या दौ-यात ही खदखद पुन्हा एकदा बाहेर आली.राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या काळात हा वणवा आणखी पेटेल अशीच दाट शक्यता आहे.
शुर पराक्रमी राजपूतांच्या राजस्थानमध्येही काही वेगळी परिस्थीती नाही.या राज्यात धार्मिक नाही तर जातीय अस्वस्थता आहे.आरक्षणाच्या मागणीकरता राष्ट्रीय संपत्ती वेठीसं धरणारं नवीन 'गुज्जर मॉडेल ' या राज्यानं देशाला दिलंय.गुज्जर आणि मीना या जातींमधली तेढ कमी व्हावी याकरता कोणतचं राजकीय पक्ष नेता प्रयत्न करत नाहीयं...उलट विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो या जातीचा दुराभिमान गोंजारण्याचाच प्रयत्न करतोय.आता राज्यात विधानसभा निवडणुका येतायत.त्यामुळं नवीन आश्वासन दिली जातील....आणि निवडणुकीनंतर ही आश्वासन पुर्ण करण्याकरता दबावाचं आणखी एक मॉडेल समोर येईल...
आर्थिक राजधानी मुंबईतही वेगळी परिस्थीती नाही.अमेरिकन अर्थव्यवस्थेवर साचलेल्या काळ्या ढगाची सावली मुंबईवरही पडलीय...शेअरबाजार कोसळतोय,हवेत संचार करणा-या शेकडो युवकांचे करीयर जमीनदोस्त होतंय.....मोठे उद्योग राज्याकडं पाहतही नाहीत,शेतक-यांच्या आत्महत्या तर सरकारी कुचेष्टेचा विषय बनलाय.सत्ताधारी पक्षं मात्र मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करुन नवीन राजकीय,सामाजिक गणीत (की समाजमनामधली भिंत) उभी करण्याचा प्रयत्न करतायत.तर जवाबदार समजवून घेणारे विरोधी पक्ष संकुचीत भाषीय राजकारणाची वर्षानुवर्षे वाजवलेली टेपचं पुन्हा एकदा बडवतात...
भारतातल्या वेगवेगळ्या भागात घडणारी ही काही प्रातिनिधीक तरीही खुप मोठा दूरगामी परिणाम करणारी उदाहरणं....देशात दिल्लीपासून बंगळूरु पर्यंत आणि अहमदाबाद पासून अगरतळामध्ये बॉम्बस्फोट होतायत....हे स्फोट घडवणारे हात कोणत्या परकीय देशामधले नाही,तर तुमच्या आमच्या सबोत राहणारे,आपले भारतीयचं आहेत. हिंदी चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात व्हीलनची प्रतीमा आता बदलू लागलीय.सध्याच्या समाजातले व्हीलन हे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये भल्या मोठ्या पॅकेजची नोकरी करतात.दळणवळणाकरता ईमेल,लॅपटॉप सारखी आत्याधुनीक साधनं वापरतात.पुणे मुंबई धारवाड सारख्या भागात शांत,चार चौघासारखं आयुष्य जगणारे हे तरुण आज तितक-याच थंडपणे दिल्ली अहमदाबाद सारख्या शहरात बॉम्बस्फोट घडवतात या बॉम्बस्फोटामुळे नागरिकांच्या आयुष्यातली मोडलेली घडी बसवण्यापेक्षा राज्यकर्त्यांना आपल्या कपड्याची इस्त्री मोडणार नाही याचीच जास्त काळजी आहे.
देशाचं सारं अवकाश व्यापून टाकणा-या या काळ्या ढगांच्या सावलीमुळे कोजागिरीचा चंद्र मला काळा दिसला असावा... पडलीय.....ही काळी सावली घाणवण्याकरता लक्षावधी दिवे लावण्याची वेळ आता आली आहे...मात्र हे दिवे लावण्याकरता कोण पुढं येणारं .ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरता किती काळ्या कोजागिरी पार कराव्या लागतील हे सांगणं शेअर बाजाराचा वार्षिक अंदाज सांगण्यापेक्षाही अवघड आहे.

2 comments:

Niranjan Welankar said...

Atyant uttam varnan, samvedanshil.. Pan varnanachya, vishleshanachya pudhe kadhi janar ? Tya sandaratlya prayatnanchahi varnan ani vishleshan yava. Keep it up. Good batting.

Unknown said...

very good an very very true it will take how many years te eka devlach mahete asaw as vatat aahe khup chan varnan good keep it up

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...