Wednesday, August 27, 2014

लव्ह जिहाद - दहशतवाद्यांचे नवे अस्त्र


तारा सचदेव राष्ट्रीय पातळीवरची नेमबाजपटू.  राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणा-या ताराची नेमबाजीच्या कोर्टवर एका युवकाची भेट झाली. त्या युवकानं ताराला  स्वत:च नाव रणजितकुमार कोहली सांगितलं.  रणजित ताराचा सराव पाहण्यासाठी नियमित येत असे. तारा-रणजितची सुरुवातीला ओळख नंतर मैत्री मैत्रीतून प्रेम आणि या प्रेमाचं रुपांतर विवाहात झालं.सात जुलै 2014 या दिवशी रांचीमध्ये झालेल्या या लग्नात शहरातल्या अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या.   अगदी चार-चौघांप्रमाणेच सुरु असलेल्या ताराच्या या आयुष्याला लग्नानंतर मात्र एक धक्कादायक वळण लागलं.

      ज्या रणजितवर विश्वास ठेवून तारानं लग्न केलं. त्याचं खरं नाव रणजितकुमार कोहली नसून रकिबुल हसन असल्याचं ताराला लग्नानंतर पहिल्याच दिवशी ताराला समजलं. रकिबुलनं काही मौलवींना घरात बोलवून ताराला इस्लाम स्विकारण्यास सांगितलं. तारानं धर्मांतर करण्यास नकार दिला. या नकारामुळे नंतरचा महिनाभर तिचा सतत छळ करण्यात आला. घरात उपाशी कोंडून ठेवणे, तिच्या गनपॉईंटवर बंदूक ठेवून  शारीरिक संभोग आणि अंगावर कुत्रे सोडणे यासारखा अमानवी छळ केल्याची तक्रार तारानं केलीय. या काळात ताराचं नाव बदलून सारा असं  ठेवल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आलाय.

     एका हातात तलवार आणि दुस-या हातात कुराण घेऊन भारतासह जगभरात इस्लामाचा प्रचार झाल्याची अनेक उदाहरणं या इतिहासात ठिकठिकाणी आढळतात. एखादा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर त्या भागात मोठा नरसंहार करणे आणि त्या प्रदेशातल्या स्त्रियांवर अत्याचार करुन त्यांचे सक्तीनं धर्मांतरण करण्याचा कार्यक्रम या इस्लामी राज्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा राबवलाय. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये या कट्टरवादाचा रुप बदललंय. मात्र त्याचा उद्देश तोच आहे, धर्माचा प्रसार. धर्म प्रसारासाठी या कट्टरवाद्यांच्या नव्या अस्त्राचं नाव आहे, 'लव्ह जिहाद'.

      रांचीमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या तारा सचदेव प्रकरणामुळे लव्ह जिहादचा मुद्दा सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही याबाबतच्या तक्रारीची गेल्या काही दिवसांपासून नोंद झालीय. पण गेल्या किमान 10 वर्षांपासून 'लव्ह जिहाद'चा हा अजेंडा देशभर राबवण्यात येतोय.केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेलं पुणे शहर, मराठवाड्यातले सर्वच जिल्हे या भागात अशा प्रकारच्या लव्ह जिहादची प्रकरणं वारंवार समोर आली आहेत.


           काय आहे लव्ह जिहाद ?

लव्ह जिहाद रोखण्यासाठी तसंच याला बळी पडणा-या तरुणींना परत आणण्यासाठी सुरु असलेल्या 'बेटी बचाव' अभियानातल्या कार्यकर्त्यांशी  चर्चा केल्यानंतर या लव्ह जिहादचे स्वरुप समजू शकते.त्यांच्या पद्धतीनुसार  मुस्लिमेतर तरुणींशी मैत्री करायची, वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन काही तात्कालीन कामात तत्परतेनं मदत करुन  त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्या धर्मावर टीका करत असतानाच त्यांच्यासमोर इस्लामाचे उद्दात्तीकरण करायचे, शाहरुख, आमिर, सैफ अली या सारख्या मुस्लिम अभिनेत्यांनी हिंदू स्त्रियांशी केलेल्या विवाहाचा दाखला द्यायच ( त्यांचे विवाह हा पूर्ण वैयक्तिक भाग असेल. यामध्ये जबरदस्ती नाही हे मान्य. पण एक उदाहणर म्हणून त्यांचा वापर लव्ह जिहाद्यांकडून केला जातो. या अभिनेत्यांचा समाजमनावर असलेला पगडा लक्षात घेता त्यांच्या या वैयक्तिक गोष्टींचा वापर मोठ्या खूबीनं एक 'गुंतवणूक' असा केला जातोय )या मुलीला फुस लावून कुटुंबापासून विभक्त करायचे, नंतर मौलवीच्या साक्षीनं तिच्याशी निकाह करुन तिचे धर्मांतर करायचे, हा सारा प्रकार स्वखुषीने होत असल्याचं भासवून तिच्या कागदावर सह्या घ्यायच्या. काही काळ तिचा 'वापर' झाला की नंतर या मुलीला सोडून द्यायचे किंवा त्यांची रवानगी कुंटणखाण्यात करायची अथवा आखाती किंवा आफ्रिकन देशात त्यांची  विक्री करायची. मुस्लिमांची जननसंख्या वाढवण्यासाठी देशभर सुरु असलेला हा प्रकार लव्ह जिहाद म्हणून ओळखला जातो.

      केरळ तसंच कर्नाटकातल्या मंगळूरु जिल्ह्यात सक्रीय असलेल्या 'पॉप्यूलर फ्रंट' य़ा धार्मिक संस्थेचं लव्ह जिहादला मोठं पाठबळ असल्याचं मानलं जातं. केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलनं या प्रकरणी केलेल्या दाव्यानुसार 4 हजार 500 युवतीनं याचं लक्ष्य बनवण्यात आलंय. तर एकट्या  कर्नाटकात 30 हजार युवतींच लव्ह जिहादच्या अंतर्गत धर्मांतर करण्यात आल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीनं केलाय. केरळमध्ये 2006 नंतर अडीच हजार पेक्षा जास्त महिलांनी मुस्लिम धर्माचा स्विकार केल्याची माहिती  केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी 25 जून 2014 या दिवशी राज्य विधानसभेत दिली होती.अर्थात या सर्व महिलांचे सक्तीनं धर्मांतर झालं किंवा हा सारा प्रकार लव्ह जिहादचा भाग आहे हे सारे दावे सन्मानीय चंडी साहेबांनी फेटाळून लावलेत.

           शेहान शा आणि सिराजुद्दीन विरुद्ध केरळ सरकार या 2009 साली उघड झालेल्या प्रकरणातही लव्ह जिहादची कार्यपद्धती समोर आली आहे. ( या संपूर्ण प्रकरणाबाबत माझे मित्र विक्रम वालावलकर यांनी इथे सविस्तर लिहले आहे. सर्वांनी ते आवश्य वाचावे )  या प्रकरणाच्या निकालपत्रात मा. न्यायाधिशांनी संविधानातले 25 वे कलम धर्मस्वातंकत्र्य, प्रेम विवाह, जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतर आणि या सर्व प्रकारात सरकारची जबाबदारी याबाबत सविस्तर विश्लेषन केलं आहे. ठराविक धर्माच्या मुलींना अन्य धर्मांत धर्मांतरित करण्याचे योजनाबद्ध पद्धतीनं प्रयत्न काही संघटना करत आहेत, याची दखल सरकारने घ्यायला हवी.  भारतीय संविधानातले 25 वे कलम कोणत्याही व्यक्तीच्या सक्तीनं धर्मांतर करण्याच्या कारवाईत गुंतण्याची परवानगी देत नाही. 
   
 मा. न्यायाधिशांच्या विवेचनातला पुढचा भाग जास्त महत्त्वाचा आहे. '' पालकांना आपल्या पाल्याला हवे तसे घडविण्याचा अधिकार नजरेआड करता येणार नाही. केवळ मुलगा किंवा मुलगी वयात आली म्हणजे त्याच्या / तिच्या पालकांना त्यांच्या भविष्याबाबत किंवा करियरबाबत काहीही बोलता येत नाही असा होत नाही. पालकांना आपल्या मुलाचे संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांना मुलांचे करियर घडवण्याचा तसंच त्यांना मार्गदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मुलींच्या पालकापासून हे अधिकार हिरावून घेण्याची संधी कलम 25 देत नाही. कलम 25 व्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करते पण याचा उद्देश कुुटुंबव्यवस्था आणि संस्कृती नष्ट करणे असा नाही.''

2009 मध्ये केरळ उच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालपत्रात लव्ह जिहादच्या कारवाया रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना पुरेशे निर्देश दिलेले आहेत. अर्थात या अंतर्गत नेमक्या किती महिलांचे धर्मांतर झाले यासाठी कर्नाटक सरकारने यापूर्वी नेमलेल्या सीआयडी चौकशीमध्ये ठोस माहिती मिळाली नाही. परंतु या भागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या घटना, या परिसरतून हिंदू तरुणी अचानक बेपत्ता होणे, त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी इस्लाम धर्म स्विकारल्याचा प्रकार समोर येणे ( अर्थात यातील बहुतेक धर्मांतर हा स्वखुषीने केल्याचा दावा होतो ) केरळ आणि कर्नाटकातला सामाजिक असमतोल ढासळण्यासाठी
पुरेसा आहे.

केरळ,  कर्नाटात पाच वर्षांपूर्वी जे उघडकीस आलं तेच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये सध्या येत आहे. तारा सचदेवनं या प्रकरणी तक्रार करण्याचं धैर्य दाखवलं, आणि हे सारं प्रकरण बाहेर आलं. पण बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या सारख्या राज्यातल्या मुस्लिम बहुल भागात अशा अनेक तारा सचदेव आजही दहशतीमध्ये जगत असतील हा विचार अस्वस्थ करणारा आहे.

धर्मांतरासाठी होत असलेल्या या लव्ह जिहादचा वापर जननसंख्या वाढवणे हाच आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यात गेल्या 50 वर्षात लक्षणीय रित्या वाढत असलेली एकाच धर्माची लोकसंख्या हा त्या सर्व प्रदेशाचा कारभार आपल्या ताब्यात घेण्याचा संघटित प्रयत्नच म्हणाव लागेल. बांग्लादेशी नागरिकांच्या अनिर्बंध घुसखोरीचा ताण भारतीय अर्थ तसंच प्रशासकीय व्यवस्थेला सहन करावा लागतोच. त्याचबरोबर 'लव्ह जिहाद' च्या नावाखाली देशात विशिष्ट लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न तितक्याच जोरकस पद्धतीनं होतोय.

    आता केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, म्हणून याबाबत सर्व काही 'मोदी सरकार' करेल म्हणून स्वस्थ बसू नका. या सर्व नेटवर्कला असलेली स्थानिक मदत तोडण्यासाठी सर्व जबाबदार भारतीयांनी एकत्र येणं आवश्यक आहे. स्थानिक शासन व्यवस्था, राज्य सरकार हे केवळ मतांची भाषा समजणारं असू शकतं. मतकेंद्रीत राज्यव्यवस्थेमुळे देशाची संस्कृती गेल्या 67 वर्षात बदलून गेलीय. या बदललेल्या 'मत' संस्कृतीमुळेच लव्ह जिहाद हे नवे अस्त्र दहशतवाद्यांच्या हाती लागलंय. हे अस्त्र निकामी करण्यासाठी
संघटन हाच एकमेव उपाय आहे.

विशेष आभार - माझे मित्र आणि कायदेतज्ज्ञ विक्रम वालावलकर यांनी आपल्या सावधान ! लव्ह जिहाद या ब्लॉगमधील मजकूर वापरण्यास आनंदाने परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभर              
                        

3 comments:

Niranjan Welankar said...

अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ब्लॉग लिहिल्याबद्दल धन्यवाद! मुद्दा गंभीर आहेच. त्यावर आता किमान सार्वजनिक चर्चा होते आहे, इतकी बातमी तरी बरी आहे. हे प्रकार सगळीकडे होत आहेत. किंबहुना सेनादलसुद्धा त्यातून सुटलेले नाहीत. जागरूकता, संपर्क आणि सावधानता हवी.

Niranjan Welankar said...

अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ब्लॉग लिहिल्याबद्दल धन्यवाद! मुद्दा गंभीर आहेच. त्यावर आता किमान सार्वजनिक चर्चा होते आहे, इतकी बातमी तरी बरी आहे. हे प्रकार सगळीकडे होत आहेत. किंबहुना सेनादलसुद्धा त्यातून सुटलेले नाहीत. जागरूकता, संपर्क आणि सावधानता हवी.

Niranjan Welankar said...

अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ब्लॉग लिहिल्याबद्दल धन्यवाद! मुद्दा गंभीर आहेच. त्यावर आता किमान सार्वजनिक चर्चा होते आहे, इतकी बातमी तरी बरी आहे. हे प्रकार सगळीकडे होत आहेत. किंबहुना सेनादलसुद्धा त्यातून सुटलेले नाहीत. जागरूकता, संपर्क आणि सावधानता हवी.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...