Tuesday, April 28, 2009

इस बार...सुशीलकुमार ?


सध्या संपूर्ण देश निवडणुकीला सामोरा जातोय.जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान कोण असणार ह्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही.त्यातचं या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला अथवा आघाडीला बहुमत मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसंच प्रादेशिक नेत्यांना पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत.

काँग्रेस पक्षानं यंदाच्या निव़णुकीत पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांना आपला उमेदवार घोषीत केलंय.मात्र युपीएमधल्या सर्व पक्षांमध्ये मनमोहन सिंग यांच्या नावावर एकमत नाही ही बाब आता लपून राहीलेली नाही. त्याचबरोबर अणुकराराच्या मुद्यावरुन डावे पक्ष आणि मनमोहन सिंग यांच्यात संबध बरेच ताणले गेलेत.त्यामुळे डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यास मनमोहन सिंग यांना बलिदान द्यावे लागेल.प्रणब मुखर्जी हे काँग्रेस पक्षामधले दुस-या पक्षाचे महत्वाचे नेते. सर्वच महत्वाच्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ' पीम इन वेटींग ' असं त्यांच वर्णन केलं जात.डाव्या पक्षांची असलेली जवळीक ही त्यांची आणकी एक जमेची बाजू.परंतु त्यांची आजवरची कारकीर्द पाहीली तर ते पंतप्रधान म्हणून काँग्रेस हायकमांडला नक्कीच डोईजड ठरु शकतात.लालू प्रसाद यादव यांच्या बरोबरबरचे संबधही त्यांचे या निवडणुकीत ताणले गेलेत.त्यामुळे प्रणब मुखर्जींच्या नावाला काँग्रेस पक्ष तसंच युपीए आघाडीतएकमत होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

एनडीए आघाडी या निवडणुकीत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला आली तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होणार हे नक्की. त्यांच्या नावाला एनडीएतल्या सर्व घटक पक्षाने आगोदरचं संमती दिली आहे.एनडीएचे संख्याबळ वाढले तर जयललिलातांसारखे कुंपणावरचे पक्षही अडवाणी कॅम्पमध्ये दाखल होतील.मात्र एनडीए आघाडीला मनासाखारख्या जागा मिळल्या नाहीत तर कदाचित नितीशकुमार यांचे नाव पुढे येऊ शकते. गेल्या काही वर्षात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा देशात चांगलीच उजळली आहे.वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्यासाठी नितीशकुमार उपयोगी पडू शकतात.परंतु लालू-पासवान-मुलायम ही प्रादेशिक पक्षांची आघाडी त्यांच्या नावाला पाठिंबा देणार नाही.

शरद पवार यंदा पंतप्रधान नक्की बनणार असा विश्वास राज्यातल्या अनेक जाणकारांना वाटतोय.नवीन पटनायक,जयललिता यांनी त्यांना आता पाठिंबा दिलाय.(अर्थात हे सहकारी कधीही उलटू शकतात ) डावे पक्ष -मुलायम यांनाही पवार जवळचे आहेत.वेगवेगळ्या पक्षांना घेऊन आघाडी सरकार चालवण्याचा त्यांचा अनुभव (आठवा महाराष्ट्रामधले पुलोदचे सरकार ) जुनाच आहे.परंतु पवारांची आजवरची राजकीय काराकीर्द त्यांना त्रासदायक ठरु शकते. 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी त्यांनी केलेले बंड सोनिया गांधी अजुनही विसरलेल्या नाहीत.त्यातच पवार हे अत्यंत धुर्त आणि महत्वकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात.आपल्या सहकारी पक्षांचा शक्तीपात कतरुन आपली शक्ती वाढवण्याची कला ( आठवा 1999 नंतर राज्यात घसरत चाललेली काँग्रेसची स्थिती,जनता दल,शेकाप सारख्या पक्षांचा झाले -हास ) त्यामुळे अशा धोकादायक व्यक्तीला पंतप्रधान करण्याचा जुगार सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष करेल असे मला वाटत नाही.

या निवडणुकीच्या निकालानंतर सोनिया गांधी पंतप्रधान पदाचा आपला हुकमाचा एक्का बाहेर काढतील असे मला वाटते.सुशीलकुमार शिंदे हा काँग्रेस पक्षासाठी हुकमाचा एक्का ठरु शकतो.धक्कातंत्र देण्यात सोनिया गांधी माहीर आहेत.1999 मध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी दावा करायचा आणि 2004 मध्ये ' आतल्या आवाजाचे ' कारण देत त्यांनी देशादतल्या सर्व राजकारण्यांना चांगलाच धक्का दिला आहे.त्यामुळेच निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग यांचे नाव पुढे करुन सुशीलकुमार यांना पंतप्रधान सोनिया नक्कीच बनवू शकतात. शिंदे गांधी घराण्याशी एकनिष्ठही आहेत.गेल्या दहा वर्षात कांग्रेस सरचिटणीसपद,महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद,राज्यपालपद, उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी,केंद्रीय मंत्रीपद शिंदेंना मिळालीत.त्यातचं शिंदे मराठी आहेत.शरद पवार यांचे नाव बाजूला करण्यात आणि शिवसेनेला किमान वेळेप्रसंगी किमान तटस्थ ठेवण्यात शिंदेचे मराठीपण कामाला येऊ शकतं.

शिंदेची जात ही त्यांच्यासाठी महत्वाची ठरु शकते.ते दलीत असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष (किमान नाईलाज म्हणून का होईना...) विरोध करु शकणार नाहीत.एका दलित व्यक्तीला पंतप्रधान पदाची उमेदवारी देणं काँग्रेसला राजकीय दृष्ट्या प्रचंड फायद्याचे ठरु शकतं. देशभरात वाढत चाललेल्या माया फॅक्टरला हे चांगलं उत्तर ठरु शकतं. या सर्वाबरोबरच निरुपद्रवीपणा हा शिंदेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.गांधी मॅडमना होयबा म्हणण्यात त्यांना धन्यता वाटते.अशाच होयबा मंडळींना सोनिया गांधी भरभरुन
पाठिंबा देतात. होयबा वृत्तीमुळेच शिवराज पाटील गृहमंत्री म्हणून चार वर्षे राहीले.प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाची 'लॉटरी' लागली.सुशीलकुमार तर या सर्वांपेक्षा नक्कीच चांगले राजकारणी आणि प्रशासक आहेत.फक्त याकरता त्यांच थोडं नशीब चांगलं असायला हवं कारण नशीब बलवत्तर असेल तर दैवेगोडाही
या देशाचे पंतप्रधान बनू शकतात हे आपण अनुभवलं आहे.

3 comments:

madhuraa said...

ओंकार तुझा लेख उत्तम आहे...त्याचबरोबर तू ज्या पध्दतीने सारासार विचार आणि अभ्यास केला आहेस ते या लेखातून स्पष्ट होतयं...


मधुरा सुरपूर

WE THE PEOPLE said...

nice.......

santosh gore said...

पंतप्रधान होण्यासाठी मराठी असणं किंवा दलित असणं महत्वाचं आहे का ? पंतप्रधान निवडला जावा योग्यतेच्या निकषावर जातीच्या नव्हे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...