Tuesday, April 14, 2009

धुमसता भारत


महिला दहशतवादी भारतामध्ये घुसण्याच्या तयारीत-लष्करप्रमुख
ओरिसामधल्या खाणीवर नक्षलवाद्यांचा हल्ला
आसाममध्ये पंतप्रधानाच्या सभेच्या आधी बॉम्बस्फोट
तालिबानी दहशतवाद्यांची सुरु आहे काश्मीरमध्ये घुसखोरी

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु असताना या सर्व घडमोडींना हल्ली वर्तमानपत्रात अथवा वृत्तवाहिन्यांमध्ये फारसे स्थान दिलं जात नाहीय..परंतु देशाच्या सर्व बाजूला सध्या धुमसती परिस्थीती आहे.आपण वेळीच सावध झालो नाही तर विध्वंसाच्या वेढ्यातून बाहेर पडणं आपल्या देशाला अवघड होऊ शकत.

आपला सर्वात डोकेदुखी शेजार म्हणजे पाकिस्तान.एका failed state साठी आवश्यक अशा सर्व कसोट्या आता पाकिस्तानने पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तान काही लाख रुपयात आत्मघातकी व्यक्ती मिळू शकतो असं गृहमंत्री रेहमान मलिक यांनी नुकतेच कबूल केलय.त्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे नियोजन मंत्री असिफ अहमद अली त्यांनी इस्लामाबादमधे एका परिसवादात कबूल केले की पाकिस्तानात आज ४० टक्के लोक गरीबी रेषेच्या खाली आहेत. मुंबईवरील हल्ल्यात पकडला गेलेला अजमल कसाब हा असाच चौथी पास , बेकार व भुरटा चोर होता ज्याला मुल्लांनी भडकवून ' जिहादी ' बनवला. असे चार कोटी भावी अजमल कसाब आज पाकिस्तानात फिरत आहेत. बेकार व अशिक्षित लोकसंख्येला भारताविरुद्ध ' जिहाद ' लढायला उद्युक्त करण्याचा उद्योग गेले अनेक दशके पाकिस्तानात सुरू आहे.तालिबानी दहशतवाद्यांच्या टोळधाडीने संपूर्ण पाकिस्तानला जर्जर करुन सोडलंय.येत्या सहा महिन्यात पाकिस्तान कोलमडून पडेल असं भाकित अमेरिकेच्या लष्करप्रमुखांचे सल्लागार डेव्हिड किल्सुलेन यांनी नुकतंच व्यक्त केलंय. धर्माँध शक्तींना रोखण्यासाठी पाकिस्तान नावाचे बफर स्टेट असणं भारतासाठी महत्वाचे आहे.या बफर स्टेटचे बाल्कन राष्ट्रांप्रमाणे तुकडे झाले तर त्याची सर्वाधिक झळ आपल्यालाच बसेल.

देशाच्या पूर्व सीमेवरही काही फारशी वेगळी परिस्थीती नाही.दर काही महिन्यांनी ठरावीक बॉम्बस्फोटाने आसाम हादरतोय.हुजी या बांगलादेशी दहशतवादी संघटनेने ईशान्य भारतामधल्या सर्वच राज्यात व्यापक जाळं निर्माण केलंय.आसाममधल्या अनेक लोकसभा मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांना निर्णायक महत्व प्राप्त झालंय.या मतांकडे बघत सत्ताधारी पक्ष वर्षानूवर्षे काहीच कारवाई करत नाही.तर बांगलादेशी घुसखोरांचा बागुलबुवा दाखवत भाजपा आणि असम गण परिषद या पक्षांचे राजकारण सुरु आहे.त्यामुळे आसू संघटनेनं 1980 च्या दशकात ज्या प्रकारे आंदोलन केलं.तसं कोणतही आंदोलन सुरु करण्याची इच्छाशक्ती कोणत्याच संघटनेमध्ये सध्या दिसत नाही.

तामिळ अस्मितेची दुकानदारीही सध्या जोरात सुरु आहे.श्रीलंकेत प्रभाकरनचे काही बरे-वाईट झाले तर वायको इकडे रक्तपात घडवणार. वायकोला प्रभाकरनकडून नियमितपणे पैसे मिळतात असा आरोप आहे.तरीही त्याच्याकडे सर्व पक्ष डोळेझाक करणार कारण बदलत्या राजकीय परिस्थीमध्ये चारही आघाड्यांना वायको हवेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई धमक कोणीच दाखवणार नाही.श्रीलंका लष्कराकडून सर्व बाजूने चिरडली गेलेली एलटीटीई तामिळमाडूमध्ये एखादा मोठा घातपात करुन सर्व जगाचं लक्ष नक्कीच वेधू शकते.1991 च्या लोकसभा निवडणुक प्रचार काळात याच संघटनेनं श्रीपेरम्बदूरला राजीव गांधींची हत्या केली.

पश्चिम भारतामधल्या सीमा किती ठिसूळ आहेत हे यापूर्वी वारंवार सिद्ध झालंय.दहा दहशतवादी कराचीमधून बोटीतून सहजपणे मुंबईमध्ये येतात.तीन दिवस संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.दिल्ली बॉम्बस्फोटामधल्या दहशतवाद्यांना केरळमधल्या जंगलामध्ये प्रशिक्षण दिलं जातं...26 नोव्हेंबरच्या हल्ल्याला चार महिने होत आली तरही आजवर या हल्ल्यातील किमान चार महत्वाच्या दहशतवाद्यांना आपण चक करु शकलेलो नाही. या हल्ल्यातील पाकिस्तानचे सर्व पुरावे जगासमोर मांडले..तरीही पाकिस्तानला कचाट्यात पकडण्यात आपल्याला यश आले नाही.एकाही वॉँटेड दहशतवाद्याचे हस्तांतरण अजुनही पाकिस्तानने भारताकडे केलेले नाही.

देशाच्या चारही सीमांवर सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेत.दहशतवादी हल्ल्याच्या भितीने आयपीएल स्पर्धा निवडणूक काळात आपण आयोजीत करु शकत नाही.जागतिक दहशतवादाच्या रडारावर भारत आलाय. पशूपतीनाथ ते तिरुपती हा नक्षलवाद्यांचा महामार्ग या देशात तयार झालाय.झारखंड.छत्तीसगड,आंध्रप्रदेश ओरिसा या राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 'नक्षली'राज निर्माण झालंय.परंतु या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा कोणताच राजकीय पक्ष करताना दिसत नाही.

या सर्व पार्श्नभूमीवर होणा-या या लोकसभा निवडणुकीला म्हणून खूप मोठे महत्व प्राप्त झालंय.देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारे ताठ कण्याचे सरकार निवडण्याकरता सर्वांनीच मतदान करायला हवे.

3 comments:

Niranjan Welankar said...

Atyant mahattwachya vishayavar lekh ahe. Pan kahi upay yojna, sudharne sathi prayatna mandayla hawe hote. Tath kanyacha sarkar kontya party mule kharya arthane yeu shakel ? Opposite, destructive forces viruddha ladhnyasathi positive, constructive forces kuthe aahet te lihaila asta tar chan vatla asta.

santosh gore said...

पाकिस्तानला विनाशाच्या वाटेवर नेणा-या या मुल्ला आणि मौलवींच्या दाढ्या उपटून तासायला हवे. धर्माचा शांतीचा संदेश देण्याऐवजी भारत द्वेषाचं विष त्यांनी पेरलं. हा धोका ओळखून कारवाई करत आपण सावध व्हायला हवं.

Gary said...

hey onki really nice blog bhai...tu un subjects pe dhyan de raha hai jis par bass nd aur times now hi dhyan dete hai...really nice keep it up...guts hai bhai tuzme...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...