
बाळासाहेब ठाकरे. 23 जानेवारी 2009 या दिवशी ते आपल्या वयाची 83 वर्षे पूर्ण करतील.भारतीय राजकारणात अनेक नेत्यांना किंबहून प्रत्येक नेत्याला साहेब म्हणण्याची सवय आहे.मात्र ख-या अर्थाने साहेब हे नाव ज्या नेत्याला अगदी चिकटून बसलंय.ते म्हणजे बाळ केशव ठाकरे..अर्थात बाळासाहेब ठाकरे.गेली चाळीस वर्षात या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदरांच, मानाचं आणि धाकाचंही स्थान मिळवलंय.. महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा आजवरचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे ह्या नावाला टाळून पुढं जाणं अशक्य आहे.
काही व्यक्ती ह्या त्यांच्या जिवंतपणीच अगदी दंतकथा बनून गेल्या असतात..मला आठवतय 1992 साल..मी तेंव्हा जेमतेम नऊ वर्षाचा असेल.आंम्ही सारे त्यावर्षी दक्षिण भारतामध्ये प्रवास करण्यास गेलो होतो.त्या वर्शी आंम्ही जाऊ तिथं आंम्ही महाराष्ट्रीयन आहोत हे कळाले की दक्षिण भारतीय लोक बाळासाहेब ठाकरेंविषयी विचारत.त्यानंतर 2005 साली मी दिल्लीला गेलो होतो.त्याही ठिकाणी मी मराठी आहे हे समजताच दिल्लीकर लोक आंम्हाला आधी बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतचं विचारत.दिल्ली पासून अगदी कन्याकुमारी पर्यंतच्या भारतीयांच्या मनात सर्वात जास्त कुतूहल असलेले बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव मराठी नेते आहेत.गेली चाळीस वर्षे या नेत्यानं शिवसेना ही संघटना आपल्या मुठीत ठेवलीय.बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे एक अगदी घट्ट असं समीकरण आहे.
हे समीकरणं मुळात जन्माला आलं तो काळ मोठा विलक्षण आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापना नुकतीच झाली होती.मराठी माणसांचं राज्य निर्माण झालं आपले सारे प्रश्न सुटतील असं वाटणारा एक मोठा समाज या राज्यात होता.मात्र नौकरी असो अथवा उद्योगधंदे प्रत्येक पातळीवर मराठी तरुण मागं पडलेत असं चित्र त्या काळात अनेकांनी दाखवायाला सुरु केली होती (हेच चित्र आजही अनेक जण रंगवतात ) वाचा आणि स्वस्थ बसा या नावाची मालिकाचं त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंचे मार्मिक हे साप्ताहिक चालवत असे.मराठी माणसांच्या असंतोषाचा असा संपूर्ण वापर करत बाळासाहेबांनी 19 जून 1966 या दिवशी शिवसेनेची स्थापना केली.आज या घटनेला 42 वर्षे झाली आहेत.ज्या उद्देशाकरता शिवसेनेची स्थापणा झाली आहे त्यामधले किती प्रश्न अजून सुटले आहेत,याचा विचार सर्वच मराठी माणसांनी यानिमीत्तानं कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता शांतपणे करायला हवा.
रस्त्याच्या नाक्यावर टर्रेबाजी करणा-या,कोणत्याही मुद्यावर राडे करण्यास तयार असलेला संतप्त मराठी युवक हे शिवसेनेचं सर्वात मोठं बलस्थान होत.याच पोरांच्या जोरावर बाळासाहेबांचा आवाज सा-या राज्यभर आणि देशभर पोचला.बाळासाहेबांची आज जी लार्जर दॅन लाईफ अशी इमेज झालीय..ती इमेज बनवण्यात याच पोरांचा सर्वात जास्त वाटा आहे.
काही कालावधीनंतर शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका आली...ठाणे,औरंगाबाद या महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला.सेनेचे आमदार,खासदार निवडूण आले.1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. खर तर शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा कालखंड ठरला असता. मराठी माणसांचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा उठता बसता गजर करणा-या शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रतल्या मतदारांनी कौल दिला होता.मला मान्य आहे तूंम्ही साडेचार वर्षात राज्य बदलू शकत नाहीत मात्र तूमच्याकडं ते बदलण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे हे तरी दिसायला हवं..परंतु त्या साडेचार वर्षात किंवा त्या कालावधीचा अभ्यास करत असताना आजही ही इच्छा शक्ती युती सरकारमध्ये होती असं आज वाटत नाही.युती सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातामध्ये होता असे मा.बाळासाहेब ठाकरे देखील या अपयशाला तेवढेच जवाबदार आहेत.
माझं हे बोलणं काहींना अतातयीचं वाटेल परंतु युती सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा मला होत्या.त्यामुळे या सरकारच्या अपयशी कामगिरीचं शल्य मला डसतय..ज्या एनरॉन करारला अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा या नेत्यांनी केली होती.त्य़ाच नेत्यांनी या कंपनीकरता लाल गालीचा अंथरला. धारावीतल्या झोपडपट्टीवासीयांना मोफत घर का बांधीन देण्याच्या 'ठाकरी' घोषणेचाही असाच बोजावरा उडाला..वीजेच्या बाबतीत एकेकाळी स्वयंपूर्ण असणारा महाराष्ट्र अंधारात बुडाला..मुंबईत घुसणारे बांगलादेशी लोंढे कमी झाले नाहीत,लालाबाग-परळ या भागातल्या मराठी कामागारांची झाडाझडती थांबली नाही. तरीही युतीचे हे नेते त्यांच्या युवराजानं प्रायोजीत केलेल्या मायकल जॅक्सनच्या शो मध्ये गुंग होते.विचार करा मायकल जॅक्सनला कोणी कॉँग्रेसी नेत्यानं मुंबईत आणलं असत...तर बाळासाहेबांनी किती गजहब केला असता..हा कोण अमेरिकी XXX म्हणून सा-या मुंबईत शिमगा करायला त्यांनी कमी केलं नसंत. पण लाडक्या युवराजाचा हट्ट पुरवण्यास सारं युती सरकार सज्ज होतं..एक मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग सोडला तर युती सरकारच्या कालावधीत फारसं चांगलं काय घडलं हेच आता आठवावं लागतं..
युतीचं सरकार पडलं, 2004 मध्ये अगदी अनुकूल वातावरण असतानाही युतीला सत्ता मिळवता आली नाही.याही वर्शी सत्ता मिळवण्यासाठी युतीमधल्या सर्वच नेत्यांना एकदिलानं अतिशय नेटानं प्रयत्न करावे लागतील. द्रमुक,तेलगू देसम,आसाम गण परीषद,अकाली दल यासारख्या प्रादेशीक पक्षांनी स्वत:च्या जीवावर आपआपल्या राज्यात सत्ता मिळवली आहे. शिवसेना बा महाराष्ट्रातला प्रादेशीक पक्ष स्वबळावर सत्ता मिळवेल अशी शक्यता नजीकच्या कालावधीमध्ये तरी कुठही दिसत नाही.मला वाटतं बाळासाहेबांच अनिश्चीत आणि लहरी राजकारणाचा हा परिणाम आहे.
अशा प्रकारचे मुद्दे अनेक सांगता येतील तरीही बाळासाहेबांचा करीष्मा कमी होत नाही.एक रोखठोक बिनधास्त आणि मनस्वी माणूस अशीच त्यांची प्रतिमा आहे.त्यांचा दबदबा इतका आहे की छगन भूजबळ,नारायण राणे राज ठाकरे यासारखे नेते त्यांना वंदन करुनचं आपली बंडखोरी रेटत असतात.
आपल्या एका शब्दावर पेटून उठणारे, आपल्या आयुष्याची होळी करणारे युवक आपले अनुयायी असावेत असं प्रत्येक नेत्याची महत्वकांक्षा असते.बाळासाहेब या बाबतीत नेहमीच श्रीमंत राहीले आहेत.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर अशी श्रीमंती खचितच एखाद्या मराठी नेत्याच्या वाटेला आली असेल.
बाळासाहेब ठाकरे ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी ठरवलं सतं तर राज्याचा इतिहास हा बराच बदलला असता,...राज्याचा इतिहास बदलण्याची क्षमता असलेल्या या अत्यंत कमी नेत्यामंध्ये बाळासाहेबांच स्थान वरचे आहे. आपल्या शक्तीचा आणि क्षमतेचा या माणसांनं पूर्णपणे वापर खरचं केला का ? असा प्रश्न मला नेहमी पडतो..राज्याच्या इतिहासातील या झंझावती 'बाळ' पर्वाचा अभ्यास करत असताना मराठी माणसांनी खरचं अगदी शांतपणे कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता याचा विचार करायला हवा