Thursday, January 1, 2009

आरक्षणाची ऐशी की तैशी !


2009 हे निवडणुकांचे वर्ष आहे.लोकसभा तसंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहेत.निवडणुका आल्या की एखादे नवे प्रकरण (भानगड) उभे करायचे .या मुद्यावर निवडणुका लढवायच्या आणि मतं मिळवून सत्ता मिळवायाची ही परंपरा सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाळत आलेले आहेत.महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या निवडणुकीकरता एक नवा मुद्दा मिळालाय..तो आहे मराठा आरक्षण.
एखाद्या चांगल्या तत्वांची चांगल्या नियमांची या देशात कशा प्रकारे सत्यानाश केला जातो,याचे अगदी क्लासीक उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी. ज्या दलीत,मागसवर्गीय समाजाला वर्षानुवर्षे अन्याय सहन करावा लागलाय..ज्या समाजाला पिढ्यान पिढ्या गावकूसाबाहेरचं जीणं जगावं लागलंय...अशा मगास आणि अतिमागास समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याकरता आरक्षण हे तत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलं.या आरक्षणाच्या तरतूदींचा दर दहा वर्षांनी अभ्यास केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.मात्र डॉ.आंबेडरकरांनंतर आरक्षणाचा उपयोग हा केवळ व्होट बॅँकेकरताच होऊ लागला.मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर तर या देशाच्या मानगूटीवर आरक्षणाचं भूत आणखी भक्कम झालंय..हे भूत उतरवण्यासाठी प्रयत्न करण्याची हिंमत कोणत्याच पक्षात नाही..उलट ह्या आरक्षणाकरता आपणचं कसे अधिक पात्र आहोत..ह्याची गरज आपल्याला कशी सर्वात जास्त आहे..या देशात आपलीच जात सर्वात जास्त मागास किंवा अतिमागास कशी आहे.याचा प्रयत्न जो तो करु लागलाय..ज्या महाराष्ट्राचं सारी सत्ताकेंद्र ज्या मराठा ह्या एकमेव पक्षानं इतके दिवसं उपभोगली किंबहूना ब-याच ठिकाणी आजही उपभोगत आहेत तो मराठा समाजही आज आरक्षण मिळवण्याच्या मागे लागलाय...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण मराठा,राज्याचे विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर मराठा, विधान परिषद सभापती मराठा,राज्यातल्या जमिनीचे सर्वात जास्त मालक मराठा,शिक्षण संस्थाचे मालक मराठा,सहकारी संस्थांचे चालक मराठा, नगराध्यक्ष,महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समितीचे बहुतांश अधिकारी मराठा तरीही ह्या समाजाला आरक्षण मिळावं ह्याकरता काही कडव्या आणि ब-याच अंशी माथेफीरु संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच ह्याच समाजानं राज्याचं नेतृत्व केलं आहे. 1962 ते 1999 पर्यंत राज्य विधानसभेतल्या खूल्या जागेवर निवडूण गेलेले सुमारे 60 टक्के आमदार हे मराठाच आहेत.संपूर्ण राज्यभर सत्तेचं जे मराठा मॉडेल ह्या नेत्यांनी तयार केलं त्याच मराठा मॉडेलचा पराभव म्हणजे ही आरक्षणाची मागणी आहे.
ज्या शाहू-फूले-आंबेडकर यांच्या नावानं मराठा नेते आरक्षणाची मागणी करत आहेत त्याच समाजातल्या लोकांचा टोकाचा विरोध ह्या समाजानं आजवर गेला आहे.रिडल्स किंवा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर हे ह्याच सर्वात ठळक उदाहरण...अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीलाही याच काही नेत्यांनी जोरदार विरोध केला होता.मराठा समाज हा जर खरचं आरक्षित झाला तर संपूर्ण राज्याच्या समाजकारणावर खूप मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत.राज्याची सध्याच बिघडलेली सामाजिक घडी ह्या निर्णयानंतर तर पार विस्कटून जाऊ शकते.खुल्या गटातले मराठा जर 27 टक्के आरक्षण असलेल्या ओबीसी गटामध्ये दाखल झाले..तर या 27 टक्के वाल्या जातींमध्ये मोठी खळबळ माजू शकते.या जातींमधल्या कूणबीसह अन्य काही प्रबळ आणि शक्तीशाली जाती आपला समावेश मागसवर्गात करावा अशी मागणी करु शकतात.मराठा आरक्षण ह्या न्यायानं त्यांचीही मागणी ह्या कनवाळू सरकारनं मान्य करायलाच हवी...असा ह्यांचा आक्रमक आग्रह असेल.ह्या अन्य जाती आपल्या गटात येऊ नये म्हणून दलीत किंवा त्या प्रकारच्या जाती प्रयत्न करु लागलीत.आरक्षणाची मागणी मान्य करुन घेण्याकरता कशा प्रकारचा मार्ग स्विकारला पाहिजे ह्याचा पॅटर्न गुज्जर समाजानं या देशात घालून दिलाचं आहे.महाराष्ट्रतले नेत तसेच त्यांच्या अनुयायी हे पहिल्यापासूनच देशात सर्वात जास्त प्रगत असल्यानं गुज्जर पॅटर्न पेक्षा आणखी हिंस्त्र,आणखी खूनशी आणि देश तोडण्यासाठी प्रयत्न करणारे विषारी कृती कार्यक्रम अतिशय नियोजीत पद्धतीनं राबवतील ही शक्यता नाकरता येत नाही.
खर तरं या देशातल्या प्रत्येक समाजात ज्याला मराठाही अपवाद नाहीत सत्तेची विकासाची फळं काही ठरावीक वर्गानं आणि ठारावीक कुटूंबीयांनीच चाखली आहेत हे सत्य आहे.मराठा समाजतही बेकारी,दारिद्र्य आणि न्यूनगंडानं पछाडलेल्या व्यक्तींची समस्या मोठी आहे,(याच वैफल्यग्रस्त तरुणांच्या मनगटाच्या जोरावर मराठा समाजातल्या डझनभर संघटनांची दुकानं सूरु आहेत ) पुण्यातल्या भांडरकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सारखी जागतिक किर्तीची संस्था ह्याच वैफल्यग्रस्त तरुणांना हाताशी धरुन ह्या समाजतल्या स्वार्थी नेत्यांनी फोडली होती.आज खरी गरज आहे ह्या वैफल्यग्रस्त समाजाची जखम भरुन
काढण्याची गरज आहे.मराठाचं नाही तर देशातल्या अनेक समाज घटकांना आरक्षणाच्या कूबड्या देण्यापेक्षा त्यांना शैक्षणीक तसंच आर्थिकदृष्ट्य़ा स्वावलंबी बनवण्याकरता सर्वांनी प्रयत्न करायला हवा.
औरंगजेबसारख्या धर्माँध,परकीय जूलमी अशा मोगल सम्राटाची कबर खणणारी मराठा ही जात आहे. परकीय शक्तीपासून दिल्लीचं संरक्षण करणारी जात मराठा आहे. परकीय शक्तींच्या जूलमी टाचांखाली आपला देश भरडला जाऊ नये म्हणून महाराष्ट्रपासून कित्येक किलोमीटरदूर पाणीपतच्या लढाईत सर्वस्वाची होळी करुन घेणा-या पराक्रमी देशअभिमानी सैनीकांची जात म्हणजे मराठा...महाराष्ट्राच्या शौर्याचे,दरा-याचे,राकटपणाचे,कणखरतेचे आणि जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक म्हणजे मराठा...
गेल्या पन्नास वर्षात स्वार्थी राजकारण्यांच्या नादी लागून ह्या समाजतली जनता आता वाहवंत चाललीय. हा समाज असाच वाहवंत गेला तर संपूर्ण महाराष्ट्राची गटारगंगा होऊ शकते.
इंग्रजांच्या अधुनीक आव्हानांचा सामना करण्याकरता आवश्यक ते कौशल्य मराठे शिकले नाहीत..केवळ भाऊबंदीकमध्येच मग्न राहिले,म्हणून त्यांचा पराभव झाला.पर्यायाने सा-या देशाला 150 वर्षे पारतंत्र्य सहन करावं लागलं.गेल्या 60 वर्षात वेगवेगळ्या समस्यांवर मात करुन विकासाच्या मार्गावर वाटचाल करत महासत्ता होण्याचा प्रयत्न भारत करतोय.मात्र दहशतवाद आणि या दहशतवादाला थारा देणा-या पाकिस्तान सारख्या शक्तींमुळे देशासमोर सर्वात गंभीर धोका निर्माण झालाय.अशा परिस्थीत देश मजबूत करण्याकरता प्रयत्न करण्याऐवजी ह्या समाज आरक्षणाची मागणी करु लागलाय. निवडणुकीतला तात्कालीन स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून स्वार्थी मराठे नेते त्याला खतपाणी घालत आहेत.
1818 च्या पराभावाला आता 190 वर्षे झाली तरीही मराठा समाज आणि त्याचे नेते काहीच शिकत नाहीत.त्याच चूका पून्हा पून्हा करत राहतात..हे या संपूर्ण देशाचे दुर्दैवच मानलं पाहीजे.

3 comments:

Niranjan Welankar said...

Sundar lekh !
Sarvanna Navin Varshachya Hardik shubhechcha !
1818 chya sattantaravishayi Dalit perspective vegla ahe, tya perspective nusar 1818 sattantar vijay ahe ! Samajatlya anek samuhanmadhe khup vibhinnata ahe. Aso.
Aurangjeb, Panipat cha ulleh vachun khup bara vatala.
Good going.

Unknown said...

आरकक्षणपेक्षा शैक्षणीक दृष्ट्य़ा सुख सोयी पुरवण गरजेचे आहे मात्र या विषयावर कुणीच लक्ष केंद्रीत करत नाहीत याचं आश्चर्य वाटतं.तुम्ही यावर आपले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद.

santosh gore said...

Ek dam chaan. santosh gore

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...